Posts

Showing posts from November, 2025

गिरी केस - सोलापूर

Image
व्यावसायिक विषप्रयोग करणारे (Professional Poisoners)  गेल्या वर्षी मुंबई पोलिसांच्या दप्तरी (रेकॉर्डमध्ये) नोंद झालेल्या काही विचित्र गुन्ह्यांपैकी, सातारा जिल्ह्यातील दोन आणि सोलापूरमधील (Sholapur) चार गुन्हे हे "गिरी" प्रकरणे (Giri cases) म्हणून ओळखले जातात. व्यावसायिक विषप्रयोग करणाऱ्या गुन्हेगारांच्या एका टोळीने, आपण 'गिरी' मंदिराच्या व्यवस्थापकांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून, श्रीमंत व सुस्थितीतील लोकांना मंदिराच्या निधीतून मोठे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी अशी अट घातली की, कर्ज मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने, व्यवहारातील प्रामाणिकपणाची हमी म्हणून मंदिर संस्थेकडे ठराविक रक्कम 'बयाणा' ( इसारा) म्हणून जमा करावी. फसगत झालेले हे लोक आवश्यक ती रोकड घेऊन घरातून निघाले आणि या तोतया "गिरी" एजंटांसोबत काही अंतर प्रवास केला. त्यानंतर एका सोयीस्कर ठिकाणी, या एजंटांनी आपल्या बळींना (पीडितांना) विष दिले आणि त्यांच्याकडील रोकड घेऊन पोबारा केला (पळून गेले). या घटनेचे साल निश्चितपणे दिलेले नाही 1900 ते 1910 दरम्यान असावे.  संकलन / भाषांतर अ...

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।

Image
येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषात दुमदुमणाऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, म्हणजेच खंडोबाची महती अफाट आहे. मल्हारी मार्तंडाचा हा अवतार नेमका का आणि कसा झाला, याविषयी 'मल्हारी माहात्म्य' या प्राचीन ग्रंथात रंजक माहिती मिळते. सर्वसामान्य भक्तांना ही कथा काही अंशी ठाऊक असली, तरी मूळ ग्रंथातील संदर्भ अधिक रंजक आहेत. चंपाषष्ठीचे औचित्य साधून, खंडोबाच्या अवतार कथेवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप. कथासार ही कथा घडली ती सत्ययुगात (कृतयुगात). मणिचूल नावाच्या पर्वतावर ऋषीमुनींची तपश्चर्या सुरू होती. सप्तर्षी आणि धर्मपुत्र शांततेत आपले यज्ञयाग करत होते. मात्र, या शांततेला नख लावण्यासाठी दोन क्रूर दैत्य त्या ठिकाणी अवतरले  त्यांची नावे होती 'मणी' आणि 'मल्ल'. या दैत्यांनी पर्वतावर अक्षरशः धुमाकूळ घातला आणि ऋषींचे पवित्र तपोवन उद्ध्वस्त करून टाकले. गाईंचा वध केला ,ऋषींना विहरीत ढकलले व ऋषांचे आश्रम उध्वस्त केले सबंध पृथ्वीतलावर हाहाकार माजवला. मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला । त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥ नाटोपे कोणास वरे मातला । देवगण गंधर्व कांपती त्याला ॥  या आकांत...

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

Image
काडी छोटी, पण इतिहास मोठा!  आजच्या काळात आपल्या घरात किंवा खिशात असलेली एक रुपयाची काडेपेटी (Matchbox) हि खूपच सामान्य वस्तू वाटते. परंतु ही आग पेटीत बंद करण्याची कला मानवाला सहज साध्य झाली नाही.  अश्मयुगातील धडपडीपासून ते Safety Match box  पर्यंतच हा आगीचा इतिहास मोठा रंजक आहे. आग्नीचा शोध: आश्मयुगीन माणसाने कधीतरी सहज गारगोट्या घासल्या व त्यातुन आगीचा शोध लागला असावा हा अग्नी प्रज्वलनाचा प्रारंभिक इतिहास.  त्याआधी मानवाने झाड्यांच्या फांद्याच्या घर्षणाने निर्माण झालेली किंवा वीज पडून जंगलात लागलेली आग अनुभवली असणार तसेच तिच्या विविध गुणधर्ममांचे हि निरिक्षण त्याने केले असावे. आगीचा शोध मानवी सभ्यतेच्या विकासासाठी किती महत्त्वाचा टप्पा होता हे वेगळ सांगण्याची गरज नाही. एकतर आगीमुळे  कच्चं मांस शिजवून खाणं शक्य झालं, ज्यामुळे अन्नाचे पचन सुलभ होऊन मानवी मेंदूचा आकार आणि क्षमता वाढली. थंडीपासून बचाव आणि हिंस्त्र प्राण्यांपासून सुरक्षा मिळाली. पण तेव्हापासून समस्या एकच होती ती म्हणजे आग प्रज्वलित करणं हे सोपं काम नव्हतं, आणि लागलेली आग विझु न देता जपू...

डॉ.कोटणीस कि अमर कहानी मागची कहाणी

 कोटणीस कि अमर कहानी मागची कहाणी ( डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस: आंतरराष्ट्रीयवादी आणि भारत-चीन मैत्रीचे दूत ) प्रारंभिक जीवन आणि शिक्षण डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला. त्यांनी सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. १९३७ मध्ये चीन आणि जपानमध्ये युद्ध सुरू झाले. चीनने जखमी सैनिकांवर उपचारासाठी भारताकडे डॉक्टरांची मदत मागितली.  भारतीय वैद्यकीय मिशनची स्थापना 1938 मध्ये दुसरे चीन-जपानी युद्ध सुरू असताना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने चीनला वैद्यकीय मदत पाठवण्याचा निर्णय घेतला. याचे मुख्य कारण चीनचे तत्कालीन नेते माओ त्से तुंग यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वैद्यकीय मदत पाठवण्याची विनंती केली होती. काँग्रेसने ही विनंती स्वीकारली आणि पाच सुशिक्षित भारतीय डॉक्टरांचा चमू निवडला. या चमूमध्ये डॉ. मदन मोहनलाल अटल (प्रमुख), डॉ. एम. रामाचंद्र चोळकर (उपप्रमुख), डॉ. बेजॉय कुमार बसू, डॉ. देबेन मुखर्जी, आणि डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस या...

सोलापूर आणि पतंगाचे संदर्भ

Image
पतंगाचा नायलॉन मांजा विमानाच्या पंख्यात अडकला परंतु सुदैवाने दुर्घटना टळली 06/01/2025 सोलापूर च्या वर्तमानपतत्रात एका घटनेबाबत ची नुकतीच छापून आलेली बातमी . (हि वरील बातमी व लेखात वेध घेतलेल्या ऐतिहासिक घटना यांची कोणतीही तुलना करणे हा लेखाचा उद्देश नाही परंतु पतंगाचे सोलापूर च्या इतिहासाचा वेध घेतना काही संदर्भ हाती आले व ते महत्त्वाचे असल्याने या पतंगाच्या संदर्भातील बातमीच्या निमित्ताने नोंदवले आहेत .) संदर्भ क्रमांक 1 सोलापूर च्या देशभक्त क्रांतिकारकांना 12 जानेवारी 1931 रोजी फाशी दिल्यानंर देशभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलने झाली यासंदर्भातील बातमी 7 Feb 1931 रोजी The illustrated London या वर्तमानपत्रात छापून आली  यामधील एक बातमी हि मुंबईतील शहरात करण्यात आलेल्या निदर्शनाची व आंदोलकांनवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज च्या आहे. मुंबई मधे निदर्शने झाली त्याच बातमीच्या शेजारी आहमदाबाद येथील विदेशी वस्तुच्या केलेल्या होळीचा व त्यामधे शालेय मुलांनीही सहभाग नोंदवल्याचा फोटोसहीत वेध घेण्यात आला आहे . आहमदाबाद येथील शालेय मुलांनी ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून विदेशी ...

सोलापूर च्या गारुड्याची मुलाखत -1896

Image
सोलापूरचे गारुडी सय्यद जमाल यांची १८९६ सालातील 'द स्ट्रँड मॅगझिन' मधील मुलाखत (भारतात कायद्याव्दारे बंदी येईपर्यंत  गारुडी उपजिविकेसाठी करत असलेले सापांचे खेळ काही नवीन नाहीत परंतु असा खेळ करणार्यां सोलापूरच्या  एका गारुड्याची मुलाखत 1896 साली थेट लंडन मधील मसिकात फोटोसहीत छापण्यात आली.   सोलापूरच्या इतिहास आणि आठवणींच्या संदर्भात हि एक अत्यंत दुर्मिळ व जुनी मुलाखत आहे म्हणून तिची नोंद घेणे आवश्यक वाटते.) हि मुलाखत १८९६ साली  'द स्ट्रँड मॅगझिन' (The Strand Magazine) या प्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाली. जॉर्ज न्यूनेस (George Newnes) यांनी संपादित केलेले हे सचित्र मासिक लंडन येथून प्रकाशित होत होते. या मासिकाच्या 'जानेवारी ते जून १८९६' च्या अंकात 'सम पेक्युलिअर एन्टरटेन्मेंट्स' (Some Peculiar Entertainments) अर्थात, ' अजब मनोरंजनाचे प्रकार' या शिर्षकाखाली प्रकाशित झालेल्या लेखात  सोलापूरचे रहिवासी असलेले गारुडी, सय्यद जमाल यांच्या मुलाखतीचाही समावेश लेखातील इतर अजब मनोरंजनाच्या प्रकारांनसोबत केला गेला. सोलापूरचे गारुडी सय्यद ...

सोलापूरच्या कल्याण मागाला रौप्य पदक -1921

Image
REPORT ON THE ALL-INDIA HANDWEAVING EXHIBITION, PATNA, 1921. "विणकाम प्रदर्शनातील सोलापूरचा ठसा - कल्याण माग" टॅपेटच्या साहाय्याने साड्यांच्या काठांवर नक्षी विणण्याची पद्धत अतिशय लक्षवेधी होती. यातील काठांच्या फण्यांची रचना अशाप्रकारे केली होती की, ज्यामुळे साडीच्या मुख्य भागावर चौकटी विणणारा रंगीत धागा रेशमाच्या लाल काठांपासून वेगळा राहत असे. या प्रदर्शनात सोलापूरचे श्री. टिकेकर यांनी आपले कौशल्य सादर केले. त्यांनी स्वतः तयार केलेले धागा गुंडाळण्याचे व पिळण्याचे यंत्र, एक 'कल्याण' नावाचा स्वयंचलित माग आणि फ्लाय शटल स्लेच्या मदतीने चालणारा दख्खनी साड्यांसाठीचा एक खड्डा माग ( pit loom ) प्रदर्शित केला होता. याच प्रदर्शनात, बंगाल सरकारने देऊ केलेले सर्वोत्कृष्ट स्वयंचलित मागासाठीचे १०० रुपयांचे बक्षीस कोणालाही दिले गेले नाही, परंतु श्री. टिकेकर आणि कलकत्त्याच्या मेसर्स बेरी अँड कंपनीला त्यांच्या मागांसाठी रौप्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, विणकामाच्या उपकरणांच्या सर्वोत्कृष्ट खाजगी प्रदर्शनासाठी असलेले खास सुवर्णपदकसुद्धा सोलापूरच्...

स्वामीजींची भविष्यवाणी - 1926

Image
स्वामीजींची मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी करण्याची एक विलक्षण कहाणी बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील सोलापूर येथून समोर आली आहे बातमीतील दाव्यानुसार, सोलापूरच्या मोती स्वामी, वय वर्षे ८० यांनी सहा महिन्यांपूर्वी  भविष्यवाणी केली होती की , ते       १८ नोव्हेंबर रोजी ते निधन पावतील, असे म्हटले जाते  मृत्यूपूर्वी दोन दिवस आधीच त्यांनी आपल्या अनुयायांना आठवण करून दिली की त्यांच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे, तसेच त्यांच्या विनंतीवरून एक छायाचित्र (फोटो) घेण्यात आला . ( बातमी सोबत फोटो दिलेला नाही. ) मृत्यूच्या दिवशी त्यांनी सोलापूर शहर आणि छावणीत (कॅम्प) फिरून स्वतःच्या दफनासाठी पैसे गोळा केले, ते एका municipal councillor कडे जमा करुन स्वामी घरी गेले आणि योग मुद्रेत बसल्यानंतर त्यांनी आपले प्राण सोडले.  हि बातमी The Review-Advertiser (द रिव्ह्यू-अ‍ॅडव्हर्टायझर) या वर्तमानपत्रात छापून आली  प्रकाशन तारीख: शुक्रवार, १९ फेब्रुवारी, १९२६ (FRIDAY, FEBRUARY 19, 1926)  प्रकाशन स्थळ (संदर्भ): क्लॅरेशोल्म, अल्बर्टा...

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

Image
सोलापूर - विमान उड्डाणाच्या नोंदी -1928 Flying Notes हा बी.सी वॉर्ड यांचा लेख  29 ऑगस्ट 1928 साली बायस्टॉण्ड्ररड या मासिकात प्रकाशित झाला. सदर लेखात वॉर्ड यांनी त्या सालातील हावाई वाहतूक क्षेत्रात घडत असलेल्या प्रमुख घडामोडींचा वेध बातमीपत्राच्या स्वरूपात घेतला आहे यातील एक आचंबित करणारी घडामोड म्हणजे , 1928 च्या ऑगस्ट महिन्यात सोलापूर ते बेल्लारी या मार्गावर एका विमानाने एका भारतीय प्रवाशासह उड्डाण घेतल्याची नोंद. सदर बातमीत  हा प्रवाशी त्यांची ( An Indian air service) सेवा घेणारा प्रथम प्रवासी आहे अशी नोंदही  करण्यात आली आहे तसेच सदर घटनेचे छायाचित्र हि या बातमी सोबत जोडले आहे सदर प्रवाशाने सोलापूर ते बेल्लारी या मार्गावर विमान सेवेचा लाभ घेतला होता . कदाचित सोलापूर मधून उडालेले हे पहिले विमान असु शकते या घटनेचे महत्त्व म्हणजे तोपर्यंत भारतात आधिकृतरित्या प्रवासी विमान वाहतूक सुरू झाली नव्हती ती पुढे भारतीय उद्योगाचे जनक जे.आर.डी. टाटा यांनी  टाटा एअरलाईन्स च्या माध्यमातून १५ ऑक्टोबर १९३२ रोजी कराचीहून मुंबई (जुहू) पर्यंत (अहमदाबाद मार्गे ) टपाल आणि माल...