Posts

Showing posts from December, 2025

सोलापूर नगरपालिकेची स्थापना (१८५२) भाग -१

Image
हा लेख 'सोलापूर नगरपालिकेचा शतसांवत्सरिक ग्रंथ' या दुर्मिळ ऐतिहासिक पुस्तकावर आधारित आहे.   सोलापूर नगरपालिकेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ३ ऑगस्ट १९५३ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष स्व. आबासाहेब किल्लेदार यांच्या कार्यकाळात हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. सोलापूर शहराचा आणि स्थानिक प्रशासनाचा १८५० पासूनचा इतिहास समजून घेण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. सोलापूर नगरपालिकेचा इतिहास: स्थापना, पहिले मानकरी आणि प्रशासनाची सुरुवात १. नगरपालिकेच्या स्थापनेची गरज  ब्रिटीश राजवटीत अखिल हिंदुस्थानातील मोठ्या गावांमधील स्थानिक स्वरूपाची कामे स्थानिक कर बसवून पूर्ण करता यावीत आणि जिल्हाधिकाऱ्यांवरील (Collector) कामाचा ताण कमी व्हावा, या दुहेरी हेतूने नगरपालिकांची स्थापना करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. यासाठी १८५० साली कायदा मंजूर करण्यात आला. सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर Mr. इनव्हरारिटी यांनी २१-३-१८५१ रोजी शहराभोवतालच्या तटाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवताना, अशी कामे करण्यासाठी आणि शहराच्या देखभालीसाठी एक 'कमिटी' स्थाप...

सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णक्षण: पंडित जवाहरलाल नेहरूंचे दोन ऐतिहासिक दौरे (१९३१ आणि १९३७)

Image
  पंडित नेहरूजींचे दोन दौरे: सोलापूरच्या जनसागराचा स्वातंत्र्यलढ्यातील हुंकार. सोलापूर शहराचा इतिहास हा त्यागाचा आणि शौर्याचा इतिहास आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या शहराने दिलेले योगदान अतुलनीय आहे. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, राष्ट्रनेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूरला दिलेले दोन भेटी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. या दौऱ्यांनी सोलापूरकरांमध्ये नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध लढण्याचे बळ दिले. आज आपण 'सोलापूर समाचार' आणि 'द इंडियन एक्सप्रेस' मधील तत्कालीन वृत्तांतांच्या आधारे या दोन दौऱ्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. १. डिसेंबर १९३१ मध्ये सोलापूर एका कठीण प्रसंगातून जात होते. मार्शल लॉच्या छायेतून बाहेर पडत असलेल्या या शहराला धीर देण्यासाठी पंडितजी आले होते. टिळक चौकातील ऐतिहासिक सभा: नेहरूजी 20 डिसेंबर रोजी सोलापूर ला भेट देणार असल्याने त्यांना मानपत्र देण्यासाठी व सभेच्या नियोजनबद्ध आधी १९ डिसेंबर १९३१ रोजी टिळक चौकात एक विराट सभा पार पडली. या सभेचे अध्यक्षपद डॉ. वैशंपायन यांनी भूषविले होते. श्री. राजवाडे यांनी मांडलेला...

डॉ. ॲनी बेझंट यांचा सोलापूर दौरा (१९९६)

Image
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात १९१६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच काळात लोकमान्य टिळक आणि डॉ. ॲनी बेझंट यांनी 'होमरूल लीग'च्या माध्यमातून स्वराज्याची मागणी लावून धरली होती. या चळवळीचा प्रसार करण्यासाठी डॉ. ॲनी बेझंट यांनी देशभर दौरे केले. या दौऱ्याचाच एक भाग म्हणून ९ मार्च १९१६ रोजी त्यांनी सोलापूर शहराला भेट दिली होती. तत्कालीन दस्तऐवजांच्या आधारे या भेटीचा घेतलेला हा आढावा. सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन ९ मार्च १९१६ रोजी डॉ. बेझंट यांचे सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सोलापूर शहरातील तत्कालीन प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिलचे (जुनी गिरणी) मालक शेठ नरोत्तम मोरारजी गोकुळदास, प्रसिद्ध व्यापारी शेठ हिराचंद नेमचंद, सोलापूर नगरपालिकेचे तत्कालीन चीफ ऑफिसर आर. बी. पित्रे आणि शहराचे मॅजिस्ट्रेट यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्या सोलापूर मुक्कामाची व्यवस्था शेठ नरोत्तम मोरारजी यांच्या  निवासस्थानी करण्यात आली होती. ' रिपन हॉल' आणि नामदार गोखलेंच्या प्रतिमेचे अनावरण या भेटीती...

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories

Image
                    (Sir George Clarke Governor ) सोलापूर समाचार ता. ९ माहे जुलई सन १९१० ना० गव्हरनर साहेब यांचे आगमन पूर्वी ठरल्याप्रमाणें मुंबई इलाख्याचे नामदार गव्हरनर साहेबांची स्वारी सोलापुरास शनिवारी सकाळी मेलनें आली होती. त्यांचे स्वागतार्थ स्टेशनावर मुख्य सरकारी अधिकारी, म्यु. कौन्सिलर्स, डि. लो. बोर्डाचे मेंबर्स, श्री. राजेबहादूर नरसिंगगिरजी व गांवातील काही मंडळी गेली होती. स्टेशन प्लाटफार्म झाडांच्या कुंड्या व निशाणें वगैरेंनी सुशोभित केला होता. गाडी स्टेशनावर आल्याबरोबर मे. कलेक्टर साहेबांनी सामोरे होऊन     ना. साहेबांस उतरून घेतले. श्री. राजेबहादूर नरसिंगगिरजी महाराज, मे.जज्ज साहेब, हुजूर डे. कलेक्टर, डि. डे. कलेक्टर, मिलिटरी पेन्शनर्स व शेट नरोत्तमदास, रा. ब. साठे वगैरे लोकांच्या मुलाखती करविल्या. स्टेशनच्या बाहेर पोलिसांची सलामी घेऊन स्वारी मे. कलेक्टर साहेबांच्या बंगल्याकडे गेली. त्याच दिवशी सकाळी ११ वाजतां रिपनहॉलमध्ये ना. गव्हरनर साहेबांस म्युनिसिपालिटीकडून मानपत्र देण्यांत आलें. रिपनहॉलच्या गेटवर भव्य कमा...

सोलापूर समाचार (१९००): गिरी केस पार्ट - 2

Image
 आजच्या डिजिटल युगात सायबर क्राईम आणि ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या आपण रोज वाचतो. पण तुम्हाला माहित आहे का? १९०० च्या काळात, म्हणजे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी, जेव्हा इंटरनेट नव्हते, तेव्हाही लोकांची फसवणूक करण्यासाठी भामटे नवनवीन शक्कल लढवत असत. 'सोलापूर समाचार' या तत्कालीन वृत्तपत्रात (ऑगस्ट आणि ऑक्टोबर १९००) छापून आलेल्या काही बातम्यांवरून त्याकाळी सोलापूर आणि आसपासच्या भागात घडणाऱ्या गुन्ह्यांचा आणि 'स्कॅम'चा (Scam) उलगडा होतो. सोलापूर समाचारच्या 1900 च्या अंकातील दोन बातम्या १. भामट्यांची नवीन टोळी: देवाच्या नावाने आर्थिक फसवणूक ( गिरी केस) आज जसे लोक 'लॉटरी लागली आहे' किंवा 'स्वस्त कर्ज मिळेल' या आमिषाला बळी पडतात, तसाच प्रकार १९०० साली सुद्धा घडत होता. 'सोलापूर समाचार'मध्ये "भामट्यांची नवीन टोळी" या मथळ्याखाली एक सविस्तर बातमी छापली होती. स्कॅम (Scam) काय होता? काही लबाड लोक स्वतःला 'गिरीच्या व्यंकोबा' देवस्थानाचे गुमास्ते (प्रतिनिधी/मुनीम) म्हणून फिरत असत. त्यांचा दावा असे की, "देवाकडे भरपूर पैसा आणि सोने...

श्री खंडोबा देवाचा परिवार

Image
मागील लेखात मल्हारी मार्तंड अवताराची कथा देण्यात आली होती, जिचा आधार 'मल्हारी माहात्म्य' हा प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. परंतु या मूळ ग्रंथात खंडोबाच्या विवाहासंबंधी भाष्य नाही, तसेच बाणाई व हेगडे प्रधान यांच्या कथा किंवा वाघ्या-मुरळीची चर्चा नाही (संदर्भ: रा.चि. ढेरे - दक्षिणेचा लोकदेव श्री खंडोबा) खंडोबाची उपासना आणि त्याच्या परिवारासंबंधित लोककथा व त्यांचे संकलन 'मार्तंड विजय' आणि 'जयाद्री माहात्म्य' यांसारख्या ग्रंथांत नंतर येत गेले. 'मल्हारी माहात्म्य' या ग्रंथाचा कर्ता व काळ निश्चित नाही, तो साधारण १२६०-१२७० च्या दरम्यानचा असावा (रा.चि. ढेरे). हा ग्रंथ सिद्धपाल केसरींनी मराठीत आणला. तसेच 'मार्तंड विजय' हा ग्रंथ महाकवी गंगाधर कमलाकर यांनी लिहिला आहे. हा ग्रंथ शके १७४५ (सन १८४३) मध्ये लिहिला गेला, असे मानले जाते.  हा ग्रंथ ओवीबद्ध असून त्यात सुमारे ४,५५६ ओव्या आहेत. सदर लेखात श्री खंडेरायांच्या परिवारातील इतर देवता व घटकांचा आढावा घेण्यात आला आहे.  यामध्ये प्रामुख्याने खंडेरायाच्या दोन पत्नी, प्रधान तसेच खंडोबाचे वाहन घोडा व श्वानाच...

'सोलापूर टेंम्परन्स असोसिएशन' (१९०२)

Image
    सोलापूरकरांचा मद्यपानाविरुध्दचा लढा आणि        'सोलापूर  टेंम्परन्स  असोसिएशन' चा इतिहास सोलापूरच्या समृद्ध इतिहासात सामाजिक सुधारणांच्या चळवळींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. एकीकडे स्वातंत्र्यलढा धुमसत असतानाच, दुसरीकडे समाजाला पोखरणाऱ्या व्यसनाधीनतेविरुद्धही एक मोठा लढा उभारला जात होता या सर्व घडामोडींचा वेध खालील लेखात घेण्यात आला आहे. टेंपरन्स  चळवळीची गरज आणि जागतिक पार्श्वभूमी १७ व्या शतकापूर्वी जगामध्ये दारूचा वापर अत्यंत मर्यादित होता. मात्र, औद्योगिक क्रांतीनंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. मद्यपान हे केवळ एक 'पेय' न राहता, ती एक मोठी सामाजिक समस्या बनली. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे कौटुंबिक हिंसाचार, आर्थिक दिवाळखोरी आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले.  या भीषण परिस्थितीवर उपाय म्हणून १८०० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिका आणि युरोपमध्ये ' टेंपरन्स  चळवळ' (Temperance Movement) उदयाला आली. सुरुवातीला या चळवळीचा उद्देश केवळ दारूचे प्रमाण कमी करणे हा होता, परंतु समस्येची तीव्रता पाहून लवकरच 'संपूर्ण दारूबंदी' (Teeto...

Just Boy's in सोलापूर 1917

Image
एकदा मुलांच्या सभेत मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला. "ज्यांना वाटतं की आपण तायाला रात्रभर अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवावं आणि आज संध्याकाळी त्याला फटाक्यांची आतषबाजी बघायला जाऊ देऊ नये, त्यांनी हात वर करा!" प्रश्न होता ताया नावाच्या एका तेरा वर्षांच्या मुलाचा. तो वारंवार शाळेचे नियम मोडून शहरात पळून जायचा आणि शाळा बुडवायचा. तो तुलनेने नवीन होता, म्हणून अधीक्षकांचा ( Superintendent) कल त्याला माफ करण्याकडे होता, पण त्याला अनेकदा ताकीदही दिली गेली होती . अखेर अधीक्षकांनी ठरवले की यावर सर्वात चांगला निर्णय तायाचे सोबती, म्हणजेच बोर्डिंगमधली इतर मुलंच घेऊ शकतील. प्रकरण त्यांच्यासमोर मांडण्यात आलं. सभेत बरीच चर्चा झाली, काहींनी बाजू घेतली, काहींनी विरोध केला. जेव्हा मतदानाची वेळ आली, तेव्हा ताया रडायला लागला आणि दयेची भीक मागू लागला. तेवढ्यात, एका मोठ्या मुलाने उभे राहून एक वेगळाच प्रस्ताव मांडला. तो म्हणाला, "बाकीची मुलं आतषबाजी पाहायला जातील, तेव्हा मी तायासोबत राहीन. मी त्याला माझ्या ताब्यात ठेवीन." हा एक दयाळू पर्याय होता. लगेच हा प्रस्ताव मांडला गे...

सोलापूर चा उन्हाळा

Image
सोलापूर चा उन्हाळ #talesofsolapur हा मजकूर कोल्स पाशा (Coles Pasha) या पोलीस अधीकारी जे नंतर  ईजिप्त मधे inspector general of prison (तुरुंग महानिरीक्षक ) म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांच्या सोलापूरातील नोकरी दरम्यानच्या सोलापूर संबधी काही आठवणी आहेत, ज्या त्यांनी ऑक्टोबर १९१८ मध्ये लिहलेल्या Recollections and Reflections या नावाच्या पुस्तकात आलेल्या आहेत १८८१-१८८३ या काळात, मी भारतात परतल्यावर, (विवाहानंतर) माझी नेमणूक सोलापूर येथे झाली. मला वाटते की हे ठिकाण कलदगीनंतर बॉम्बे इलाख्यातील सर्वात खराब स्टेशन होते. येथील हवामान चांगले नव्हते, मनोरंजनाचे खेळही नव्हते आणि माझे कामही फारसे रंजक नव्हते. पंढरपूर, जे हिंदूंचे एक पवित्र स्थान आहे, ते याच जिल्ह्यात होते आणि वार्षिक वारीच्या वेळी पोलिसांना खूप कठोर काम करावे लागत होते. ज्या विशिष्ट मंदिराची इतकी पूजा केली जाते, तिथे जाण्यासाठी एक अरुंद मार्ग आहे, ज्यातून हजारो वारकऱ्यांना वाट काढून द्यावी लागते, त्यांना काही क्षणांसाठी दर्शन घेऊ दिले जाते, त्यानंतर त्यांना परत खेचून दुसऱ्या मार्गाने बाहेर काढले जाते. तरीही, या काही क्षणांसाठी, भ...

भिमरावांचा संप १९२०

भिमरावांचा संप १९२० ( सोलापूरातील महान कामगार नेत्याचा विस्मृतीत गेलेला इतिहास ) हि घटना १९२० सालची. त्यावेळी सोलापूर हे कापड उद्योगाचं एक खूप मोठं केंद्र होतं, पण तिथल्या कामगारांची परिस्थिती खूपच वाईट होती. गिरणी मालक प्रचंड नफा कमावत होते (एका गिरणीने तर ८ लाखांच्या भांडवलावर ३ कोटींचा नफा कमावला होता, पण कामगारांना मात्र 12 ते 14 तास काम करुनही अतिशय तुटपुंजा पगार मिळत होता. या अन्यायाविरुद्ध कामगारांच्या मनात असंतोष धुमसत होता आणि याच असंतोषातून एका मोठ्या संपाचा जन्म झाला, ज्याचं नेतृत्व भीमराव नावाच्या एका धाडसी कामगार नेत्याने केलं.  त्या वेळच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मधे मुंबई आणि अहमदाबादच्या गिरण्यांच्या तुलनेत सोलापूरच्या कामगारांचा पगार खूपच कमी होता.  पहिल्या महायुद्धानंतर महागाई प्रचंड वाढली होती परंतु पगारवाढ मात्र होत नव्हती अशा परस्थितीला हातभार म्हणून सोलापूर मधील गिरण्यांनमधे दुहेरी खाडा पध्दत अस्तित्वात होती यामधे जर कामावर एक दिवस गैरहजर राहिल्यास दोन दिवसांचा पगार कापला जायचा. याला "दुहेरी खडा पद्धत" म्हणत. यामुळे कामगारांचं मोठं आर्थिक नुकसान होत असे...

"महात्मा गांधी, सोलापूर आणि लंडन कनेक्शन: एका बटणाची गोष्ट!"

Image
गांधी बटण भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सोलापूरचे नाव १९३० च्या 'मार्शल लॉ' आणि चार हुतात्म्यांच्या बलिदानामुळे सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. परंतु, या स्वातंत्र चळवळीची बीजे त्यापूर्वीच रोवली गेली होती. १९२१ मध्ये सोलापूरचे व्यापारी आणि सामान्य जनता महात्मा गांधींच्या विचारांनी कशी भारावलेली होती, याचा एक अतिशय दुर्मिळ आणि रोमांचक पुरावा नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडियाच्या दप्तरात सापडला आहे.  ही घटना आहे सप्टेंबर १९२१ मधील. भारतात ब्रिटीश राजवटीच्या विरोधात असहकार चळवळीचे वारे वेगाने वाहत होते. अशा तप्त वातावरणात, सोलापूरच्या एका स्थानिक फर्मने थेट इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील एका कारखानदाराला कोटच्या बटणांची एक मोठी ऑर्डर दिली. विशेष म्हणजे, या बटणांवर 'महात्मा गांधी' यांचे चित्र असावे, अशी स्पष्ट मागणी सोलापूरच्या व्यापाऱ्याने केली होती व ऑर्डर सोबत नमुन्यादाखल गांधीजींचा फोटोही जोडला होता. बर्मिंगहॅमच्या 'बी. इलियट' या कारखानदाराला बटणांसाठी पाठवलेला तो फोटो पाहून मनात शंका निर्माण झाली हा फोटो कोण्या राजद्रोही बंडखोराचा तर नसेल ना ? आपण हे काम केले तर ...

लंडनची रंगभूमी गाजवणारा सोलापूरकर ( 1897)

Image
विस्मरणात गेलेला अभिनेता 'एडवर्ड ओ'नील' ( लंडन ची रंगभूमी गाजवणारा एक सोलापूरकर ) सोलापूरच्या इतिहासाची पानं चाळली तर अनेक दिग्गज व्यक्तींची नावं समोर येतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? १८९७ साली लंडनच्या रंगमंचावर गाजलेला एक नट चक्क आपल्या सोलापूरचा होता! ही गोष्ट आजवर कोणाला फारशी ठाऊक नव्हती. ३ मार्च १८९७ रोजी लंडनमध्ये प्रसिद्ध झालेल्या 'द स्केच' या मासिकातील एका बातमीमुळे आणि जुन्या ऐतिहासिक नोंदीमुळे हा रंजक प्रवास उलगडला आहे. सोलापूरशी असलेलं नातं जगाने ज्यांना 'एडवर्ड ओ'नील' म्हणून ओळखलं,  त्या अभिनेत्याचं खरं नाव होतं 'एडवर्ड आल्फ्रेड मोर्स बेचर'. बॉम्बे स्टाफ कॉर्प्सचे कर्नल हेन्री मोर्स यांच्या स्मरणार्थ हे नाव ठेवलं होत. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १८६२ रोजी आपल्या सोलापुरात झाला. त्याकाळी सोलापूर हे ब्रिटिशांचं एक महत्त्वाचं लष्करी ठाणं (कॅन्टोन्मेंट) होतं.  एडवर्ड यांचे वडील, मेजर जनरल आल्फ्रेड बेचर हे ब्रिटीश लष्करात अधिकारी होते. १८६० च्या दशकात त्यांची पोस्टिंग सोलापूरच्या लष्करी तळावर झाली होती. त्यांच्या आ...

सुर्य ग्रहणाची बातमी - ( 1898)

Image
हे ऐतिहासिक कात्रण 'द इलस्ट्रेटेड लंडन न्यूज' (१९ फेब्रुवारी १८९८) मधील आहे. यात १८९८ मध्ये भारतात दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहणाचे, आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील जेऊर (Jeur) येथील निरीक्षणांचे वर्णन केले आहे. सूर्याचे खग्रास ग्रहण  "गेल्या आठवड्यात आम्ही सर नॉर्मन लॉकयर (Sir Norman Lockyer) यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश ग्रहण मोहिमेच्या विजयादुर्ग (Viziadrug) येथील शिबिराची काही चित्रे प्रकाशित केली होती. आता आम्ही त्याला सोलापूर जिल्ह्यातील जेऊर (Jeur) येथे घेतलेल्या दृश्यांची जोड देत आहोत, जिथे अनेक तज्ज्ञ निरीक्षणासाठी तळ ठोकून होते.    ( "जेऊर (Jeur) येथे सर ऑर्थर हॅवलॉक   आणि त्यांची मंडळी  दुर्बिणीजवळ ग्रहणाची वाट पाहत असताना.")   (पहिली आकृती जेऊर येथील आमच्या बातमीदाराने पाहिलेले कोरोनाचे (सूर्याचे प्रभामंडल) दृश्य दर्शवते.)  खग्रास स्थिती (Totality) २ मिनिटे १० सेकंद टिकली. सावलीतील तापमान ८२ अंश फॅरेनहाइटवरून ७७ अंशांपर्यंत खाली आले. अंधार अपेक्षेपेक्षा खूपच कमी होता; आकाशाचा रंग शिशासारखा (leaden hue...

मोटार नोंदी - सोलापूर (1924)

Image
The Tatler (1924) या मासिकातील Rolls-Royce Car (20-HP) चा Review. मोटार नोंदी आणि बातम्या (Motor Notes and News) या सदराखाली देण्यात आला होता. २०-एच.पी. रोल्स-रॉयस कार चे बॉम्बे (मुंबई) आणि सिकंदराबाद दरम्यानच्या रस्त्यावर. ज्या वेळी हे छायाचित्र काढले गेले, तेव्हा चालकाने नुकतीच एका काळविटाची (buck) शिकार केली होती, जी तो दुपारच्या जेवणासाठी सोलापूरला (Sholapur) घेऊन जात होता, कारण ताजे अन्न मिळणे तिथे कधीकधी थोडे कठीण असते.छायाचित्रातील 'बीन' (Bean) कार टांगानिका (Tanganyika) आफ्रिका येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे संचालक मेजर सेलँडर (Major Selander) यांची आहे. मेजर सेलँडर यांनी ही कार फेब्रुवारी १९२४ मध्ये खरेदी केली आणि त्या देशात काही महिने चालवली, त्यानंतर जुलै १९२४ मध्ये ती त्यांच्याकडे जहाजाने पाठवण्यात आली( भारतात) छायाचित्र पाठवताना, मेजर सेलँडर लिहितात,  'मी माझ्या कारचे आणखी एक छायाचित्र सोबत जोडले आहे, जे नैऋत्य (S.W.) जिल्ह्यातील सोनगिया (Songea) जवळ, रेल्वेपासून सुमारे ५०० मैल अंतरावर घेतले आहे. तो पूल एका खोल दरीवरील लाकडी रचना आहे. तो एका तीव्र...